विरहाची शेवटची वेळ...कोणी तुझ्या सारखं नाही
विरहाची शेवटची वेळ..
कोणी तुझ्या सारखं नाही..
हळूच यायचं आणि निघुन जायचं,
थोडं बघायचं आणि चाललं जायचं,
थोडं बोलायचं आणि गप्प बसायचं,
झोपीतून उठायचं आणि झोपून जायचं
कारणे खूप आहेत, पण वेळ मात्र नाही,
समोरचा काय विचार करत आहे मान्य नाही,
वाट बघत असेल का नाही, माहिती नाही,
आता प्रवास शेवटचा,
या पुढे यायचं नाही
आणि जायचं नाही, बोलायचं नाही,
गप्प बसायचं नाही, झोपीतून उठायचं,
आणि परत झोपायचं,
शेवटी एकटाच
................
रविंद्र पांडुरंग बनसोडे
अंबड
9307220454


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा