प्रेम हे खरंच एक गुंतागुंतीचं कोडं आहे.

 प्रेम हे खरंच एक गुंतागुंतीचं कोडं आहे. जिथे आपलं मन कितीही साफ असलं तरी कुठेतरी एक कोपरा असतोच जिथे खंत आणि अपेक्षा वसतात. मनाला वाटतं की बोलावं, व्यक्त व्हावं, कधी तरी भेटावं, एकमेकांना पाहावं. पण त्याहूनही एक जास्त खोल खंत म्हणजे ती ‘आशा आणि अपेक्षा’ पूर्ण करण्याची असोशी.


कधी कधी आपलं मन आपल्यालाच प्रश्न विचारतं - "हे सगळं मी का करत आहे? मीच का पुढाकार घ्यायचा?" पण खरं प्रेम असलं तर कधी ना कधी वेळही सापडतो आणि त्या अपेक्षांचा बोजाही कमी होतो.


म्हणतात ना, प्रेम हे दोन टोकांसारखं असतं. एकटे आपण कधीच ते जगू शकत नाही. जसे नाण्याला दोन बाजू असतात, तसेच प्रेमातही दोन मनं असतात. एकमेकांना समजून घेतात, अपेक्षा जरी असल्या तरी त्या पूर्ण करण्यासाठीची तळमळ असते.


पण या खेळात, नेहमीच असं होतं की दुसऱ्या कुणाचं तरी मनात असतं. एक विरुद्धाच्या बाजूला झुकत असतं. त्यामुळेच प्रेम हे एक अद्वितीय, अतरंगी अनुभव आहे, ज्यात आपल्याला स्वतःलाही कधी कधी हरवून जायला लावतं.


"प्रेम खरं आहे का?" हाच खरा प्रश्न. कारण जर ते खरं असेल तर अपेक्षा असणार नाहीत. एकमेकांना मोकळेपणाने समजून घेण्याचं सुख असेल. आणि तिथेच कदाचित खऱ्या प्रेमाचं खरं सौंदर्य असतं.



टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट